बोलताना तुझ्याशी भान मी हरपलो,
तुला बघायला दररोज मी तरसलो.
भेटशील तू मला, ही आशा मनात होती,
पण भेटायला तुला योग्य संधी मिळत नव्हती.
मी मारलेल्या जोकवर तुझं खदखदून हसणं,
तू दिलेल्या सरप्राइजनं माझं आश्चर्यचकित होणं,
मी दुःखी असताना तुझे डोळे पाणावणं,
तू अडचणीत असताना माझं मदतीस सरसावणं.
आठवण येत होती मला कायम ह्या सगळ्याची,
पण तुझी सावलीदेखील माझ्या आसपास नसायची.
कायम मी जगायचो तुझ्या आठवणींमध्ये,
कायम मी बघत राहायचो तुझ्या फोटोकडे.
परत सोडून गेलीस तर जगणं अशक्य होईल मला,
माझ्या मनातली ही भावना मी कशी सांगू तुला?
कदाचित देवानेच आहे आपलं कनेक्शन जोडलेलं,
कारण नातं आहे आपलं शब्दांच्या पलीकडचं.
ही कविता ०२ जुलै २०२० रोजी लिहिलेली आहे