Submit your work, meet writers and drop the ads. Become a member
कशात हुडकावा आनंद
हे आजकाल कळेनासं झालंय,
आनंदी राहायचं कारण
आजकाल मिळेनासं झालंय.

जुने दिवस आठवावे म्हणतो,
जरा भावनिक होईन म्हणतो...
पण मग पडतो प्रश्न येऊन –
की भावना तरी उरल्यात का आता?
आश्रू अनावर व्हायला,
ते अश्रू तरी उरलेत का आता?

प्रेमाला शोधायच्या आशेने
आयुष्याच्या जंगलात भटकतो,
खोट्या आशेच्या नदीत
थोडा वेळ पहुडतो.
पण होईन का मी ओला प्रेमाने त्या नदीत?
का होईल मला भास,
आणि पडेन मी दुःखाच्या दरीत?
का दिसेल मला मृगजळ
त्या भाबड्या, प्रेमळ हरणाचं?

जाऊदे ते सगळं –
मी जाऊन काहीतरी खातो,
पाणीपुरीतलं पाणी
जरा मिटक्या मारत पितो.
पण मग येतं डाएट आडवं
आणि दाखवतं जाडी माझी –
"३६ ची पॅन्ट घालायची लायकी आहे का तुझी?
पोटावर पडल्यात वळ्या,
आणि गाल झालेत गुबगुबीत,
हत्ती सारखे पाय तुझे,
शरीर दिसतंय बटबटीत!"

मग आठवतं मला करिअर,
आणि मिळवू म्हणतो पैसा...
करिअरच्या टेन्शनने
क्षीण होऊन जातो नाहीसा.
इतके श्रीमंत होऊ की
असेल बंगला, गाडी,
भरपूर फ्लॅट घेऊ,
महिन्याला येतील भाडी.
पण तिथे तरी हा माजोर्डा रूबाब
देईल का मला सुख?
आणि एवढं सगळं करून शेवटी मला
राहील का आनंदाची भूक?

कशात हुडकावा आनंद?
हे आजकाल कळेनासं झालंय...
आनंदी राहायचं कारण
आजकाल मिळेनासं झालंय.
ही कविता २८ मे २०२५ रोजी लिहिलेली आहे
काश उस दिन उसका भी कोई भाई होता,
आज वो सितारा हमारे बीच ज़िंदा होता।
काश कोई उसे जाकर बचा लेता,
कम से कम उसका तो ख़ून न बहता।

नरभक्षी भेड़ियों ने ली थी उसकी जान,
छोड़ा था उसे वहीं तड़पता, लहूलुहान।
चिल्लाती रही वो उसी जगह पर,
न जाने कितने ही जुल्म हुए थे उस पर।

नारी को निर्वस्त्र करने का परिणाम –
इस भूमि ने महाभारत देखा था।
धिक्कार है ऐसे समाज पर –
उसी भूमि ने आज यह अपराध देखा था।

जल रही हैं मोमबत्तियां शोक व्यक्त करने,
आंदोलन कर रहे हैं लोग और दे रहे हैं धरने।
क्या इस बार होगा उन दरिंदों पर कठिन शासन,
या फिर एक बार उभरेगा एक नया दुःशासन?
यह कविता १९ अगस्त २०२४ को लिखी गई है
ओ मेरे मितवा,
मुझसे रूठो ना रे तुम।
मुझे प्यार हुआ है तुमसे,
तुझमें हो गए हैं गुम।

ख़ुदा से माँगी है एक दुआ –
मेरा प्यार तुम तक पहुँचा देना।
मिल गए तुम इस ज़िंदगी में,
तो फिर और क्या है पाना?

फ़ासले हमारे बीच के
चुभ रहे हैं अब मुझे,
बेसब्र हो गई हूँ अब
मिलने के लिए मैं तुझे।

इज़हार न कर पाई मैं
तुमसे अपने प्यार का,
बयान न कर सकी मैं
दिल से की मोहब्बत का।

इस प्यार की चुनौती में,
ऐ ख़ुदा, तुम मेरा साथ देना।
रूठा है वो मुझसे –
उसे कैसे भी है मनाना।
यह कविता १२ अप्रैल २०२४ को लिखी गई है
आहे मन हावरट, हवं त्याला सगळं,
संसाराच्या मोहात अडकले ते आगळं.

मित्रदेखील हवेत त्याला,
मैत्रिणीदेखील हव्या,
Relation मध्ये येऊ
अशा आशा नव्या-नव्या.

मान-सन्मान हवा,
वाहवाही हवी त्याला,
पण हवंय सगळं फुकट –
मेहनत करायची कशाला?

Materialistic मोह
त्याला आवरत नाही,
आयपत नसेल तरी मोठी गाडी घेऊ –
हरकत नाही काही.

हावरटपणाच्या या विळख्यात गुरफटून मन जाते,
आयुष्याचा शेवट मात्र फक्त राख उरते.
ही कविता १३ मार्च २०२४ रोजी लिहिलेली आहे
शब्द वापरून वाक्य बनवली जातात,
वाक्य वापरून मनातील भाव मांडले जातात.
एकेकाळी मी ज्यांच्याशी तासंतास बोलायचो,
ते आजकाल फक्त कामासाठी phone करतात.

Priority नाही आहे मी कोणाची,
फक्त एक option म्हणून उरलोय आता.
आयुष्याच्या झाडाची टवटवीत फुलं
कोमेजलेली दिसतात येताजाता.

आजकाल काही share केलं जात नाही,
WhatsApp ग्रुप्सला कधी add केलं जात नाही.
लोक भरपूर आहेत आजूबाजूला –
मित्र तर नाहीत, पण आठवणी उरल्यात काही.

मला मान्य आहे की मी आहे एक failure,
नाही जमल्या मला काही गोष्टी करायला.
आयुष्याच्या या सांडलेल्या कचऱ्याला
मला एकट्यालाच लागेल भरायला.
ही कविता १३ नोव्हेंबर २०२२ रोजी लिहिलेली आहे
काश वक़्त को थामना संभव होता,
मैं हमेशा के लिए वक़्त रोक देता।
ज़िंदगी के उस पल को, मैं
थोड़ी और देर जी लेता।

काश अपने दुख बाँटने को
कोई अपना साथ होता,
ज़िंदगी का यह सफ़र
थोड़ा आसान बन जाता।

हमेशा अपने सामने की आवाज़ सुनो,
सामने हर कोई अच्छा बोलता है।
पीछे की आवाज़ को सिर्फ़ अकेले में सुनना –
दर्द का अहसास एक झटके में मिलता है।

कभी अपने कर्म को मत रोकना,
लोगों का काम तुम्हें बुरा-भला ही कहना है।
अपने खराब नसीब के लिए तो
हर कोई भगवान को भी कोसता है।
यह कविता २२ जनवरी २०२२ को लिखी गई है
शब्दांना फोडणी लाऊनी
बनते आयुष्याचं भोजन,
भावनांच्या मसाल्याला
टाकायचं त्यात प्रयोजन.

कधी रागाचा लाल खरडा,
तर कधी आनंदाची खीर,
थोडं मजेदार आंबट लोणचं,
त्यात रुसलेल्या रसगुल्याची भिरभिर.

एक कौतुकाचा लाडू, अन
थोडी लहरी असलेली कोशिंबीर,
त्यात समाधानाच्या भातावर
आमटी बसलेली गंभीर.

भावनांच्या या जेवणाने
भरतं ताट आयुष्याचं,
पण सर्व पदार्थ खाण्याआधी
प्यावं पाणी प्रेमाचं.
ही कविता ३० एप्रिल २०२१ रोजी लिहिलेली आहे
Next page